श्री स्वामी समर्थ
श्री म्हणजेच सृष्टीचा करता - करविता असा तो स्वामी, जो मला अणु-रेणु तसेच सृष्टीच्या कणा-कणात सांभाळायला समर्थ असा तो *श्री स्वामी समर्थ*
आजच्या या घोर कलियुगाच्या काळात समाजाची मानसिकता हा खुप मोठा प्रश्न आहे, एखाद्याची नकारात्मक मानसिकता सकारात्मक कशी करणार? हे प्रत्येकाच्या पुढ्यात असलेलं मोठं संकट आहे, बदलता काळ जरी चांगला सुदृढ असला तरी त्या काळा बरोबर बिघडलेली पिढी हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात आहे.
पूर्वी चा काळ आता सारखा प्रगत नसला तरी लहान-मोठ्यांचा आदर करणारा होता आणि आता??? दहा वर्षाचं पोर सुद्धा पस्तिशीच्या व्यक्तीला सणसणीत शिवी देत, हा काळ नाही संस्कृती बदल म्हणावा लागेल. आपल्या आजी-आजोबांची लहानपण आठवा कधी? किती छान होती कारण, त्यांच्यावर घडलेले चांगले संस्कार. आताच्या फास्ट-मुव्हीन्ग लाईफ मध्ये मुलांना संस्कार घडवायला पालकांना वेळ आहे कुठे? मग म्हणायचे आम्ही मेंटली डिप्रेस झालो.
नकारात्मक विचारांचे मूळ हे इथूनच सुरु होते, सोडा ते बुरसट विचार स्वतः साठी वेळ काढा, एखादा मंत्र घ्या (स्वतःच ठरावा) आणि सतत म्हणायला सुरवात करा, जिथे मोकळा वेळ मिळतो तिथे काहीही करू नका डोळे बंद करा महाराजांना प्रार्थना करा, मी हा तुमच्या सेवेत आलोय मला काही येत नाही, मी अक्कलशुन्य आहे घ्या घडवून काय घ्यायचे ते असे म्हणून डोळे बंद करा आणि करा नामाला सुरवात. नामाचा नाद हा इतर नादापेक्षा खूप भयंकर , पण सकारात्मक शरीरासाठी अति उत्तम.
सुरवातीला तोंडाने नामस्मरण सुरु होते (आत्ताच लोणचे घातले आहे), हळुहळु डोक्यात घुमते (लोणचे मुरायला लागले) , मग ते डोक्यात भिनते (लोणच्याचा खार फोडीत मुरला समजा) आणि त्या नंतर ते हृदयात धडकते (आता लोणचे खाण्यासाठी तयार) इथूनच सुरु होतो तो नामाचा खेळ इतर गोष्टींचा विचार करायला वेळच नाही फक्त नाम आणि आपण सुरूच राहते.
उठता- बसता,ध्यानी-मनी फक्त नाम रहाते आणि आपोआप विचार बदलतात, त्यातूनच आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वाना विचार बदलायला शिकवतो वास्तविक आपण नाममात्र असतो पण त्या नामाचा प्रभाव आपल्याकडुन ते घडवतो, अशानेच आपली पुढील पिढीसुद्धा घडेल ती सुद्धा आपल्या नामस्मरणानेच.
बऱ्याच जणांना प्रश्न असतो मंत्र आपल्याला आपल्या गुरूंकडुन मिळावा, अरे पण योग्य गुरु मिळाला तर बरा नाही तर आयुष्य रस्त्याला लावेल की! आपण कशाला करा गुरु? गुरूंची इच्छा असेल तर योग्य वेळी योग्य गुरु राहील समोर उभा, तो पर्यंत आपण नामस्मरण करत राहायचे, सदेह गुरुचे मार्गदर्शन होई पर्यंत वाट पाहायची (तोपर्यंत खरा गुरु ओळ्खण्याइतकी अध्यात्मिक पातळी वाढलेली असते.) एखादे काम केल्याशिवाय मोबदला सुद्धा कोणी देत नाही , महिना दहा हजार कमावणाऱ्यालासुद्धा पूर्ण महिना भरावा लागतो, सुट्टी केली तर पगार कट केला जातो, मग आपण देवाकडून कशी अपेक्षा करतो. त्याला काही नको फक्त मनापासून त्याचे नाम घ्यावे हीच त्याची इच्छा बदल्यात आपल्याला तो खुप काही देतो.
नामात खुप शक्ती आहे आपल्या मनाचे खेळ ओळखायला शिका, उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिका, विद्या विकत नाही मिळत खरा गुरु हा नेहमी फक्त गुरु दक्षिणा घेतो ती सुद्धा योग्य वेळ आल्यावर, आजच्या युगात कमावणारे खुप आहेत पण गमवायची ताकद मोजक्यांचीच आहेत, कमरेला लंगोटी-खांद्यावर उपरणे वापरायला आवडते बाकी कपडे नकोसे वाटतात पण लोक बाबा बनवतात म्हणुन शर्ट-पॅन्ट वापरणारे बरेच आहेत पण ते खरे मार्गदर्शक आहेत त्यांना शोधा त्यांच्या कडे मीपणा नसतो नम्रपणा असते. ज्ञान वाढवा, नाम वाढवा, ध्यान वाढवा योग्य वेळेची वाट पहा. स्वामींवर विश्वास ठेवा उद्धार नक्की होणार याची खात्री.
श्री स्वामी समर्थ
स्वामींनी सुचवले आम्ही तुमच्यापुढे मांडले, करता-करविता स्वामी आम्ही फक्त नाममात्र.
आपला,
स्वामीभक्त(खुळा)
रितेश र. वेदपाठक
8421132224
श्री म्हणजेच सृष्टीचा करता - करविता असा तो स्वामी, जो मला अणु-रेणु तसेच सृष्टीच्या कणा-कणात सांभाळायला समर्थ असा तो *श्री स्वामी समर्थ*
आजच्या या घोर कलियुगाच्या काळात समाजाची मानसिकता हा खुप मोठा प्रश्न आहे, एखाद्याची नकारात्मक मानसिकता सकारात्मक कशी करणार? हे प्रत्येकाच्या पुढ्यात असलेलं मोठं संकट आहे, बदलता काळ जरी चांगला सुदृढ असला तरी त्या काळा बरोबर बिघडलेली पिढी हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात आहे.
पूर्वी चा काळ आता सारखा प्रगत नसला तरी लहान-मोठ्यांचा आदर करणारा होता आणि आता??? दहा वर्षाचं पोर सुद्धा पस्तिशीच्या व्यक्तीला सणसणीत शिवी देत, हा काळ नाही संस्कृती बदल म्हणावा लागेल. आपल्या आजी-आजोबांची लहानपण आठवा कधी? किती छान होती कारण, त्यांच्यावर घडलेले चांगले संस्कार. आताच्या फास्ट-मुव्हीन्ग लाईफ मध्ये मुलांना संस्कार घडवायला पालकांना वेळ आहे कुठे? मग म्हणायचे आम्ही मेंटली डिप्रेस झालो.
नकारात्मक विचारांचे मूळ हे इथूनच सुरु होते, सोडा ते बुरसट विचार स्वतः साठी वेळ काढा, एखादा मंत्र घ्या (स्वतःच ठरावा) आणि सतत म्हणायला सुरवात करा, जिथे मोकळा वेळ मिळतो तिथे काहीही करू नका डोळे बंद करा महाराजांना प्रार्थना करा, मी हा तुमच्या सेवेत आलोय मला काही येत नाही, मी अक्कलशुन्य आहे घ्या घडवून काय घ्यायचे ते असे म्हणून डोळे बंद करा आणि करा नामाला सुरवात. नामाचा नाद हा इतर नादापेक्षा खूप भयंकर , पण सकारात्मक शरीरासाठी अति उत्तम.
सुरवातीला तोंडाने नामस्मरण सुरु होते (आत्ताच लोणचे घातले आहे), हळुहळु डोक्यात घुमते (लोणचे मुरायला लागले) , मग ते डोक्यात भिनते (लोणच्याचा खार फोडीत मुरला समजा) आणि त्या नंतर ते हृदयात धडकते (आता लोणचे खाण्यासाठी तयार) इथूनच सुरु होतो तो नामाचा खेळ इतर गोष्टींचा विचार करायला वेळच नाही फक्त नाम आणि आपण सुरूच राहते.
उठता- बसता,ध्यानी-मनी फक्त नाम रहाते आणि आपोआप विचार बदलतात, त्यातूनच आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वाना विचार बदलायला शिकवतो वास्तविक आपण नाममात्र असतो पण त्या नामाचा प्रभाव आपल्याकडुन ते घडवतो, अशानेच आपली पुढील पिढीसुद्धा घडेल ती सुद्धा आपल्या नामस्मरणानेच.
बऱ्याच जणांना प्रश्न असतो मंत्र आपल्याला आपल्या गुरूंकडुन मिळावा, अरे पण योग्य गुरु मिळाला तर बरा नाही तर आयुष्य रस्त्याला लावेल की! आपण कशाला करा गुरु? गुरूंची इच्छा असेल तर योग्य वेळी योग्य गुरु राहील समोर उभा, तो पर्यंत आपण नामस्मरण करत राहायचे, सदेह गुरुचे मार्गदर्शन होई पर्यंत वाट पाहायची (तोपर्यंत खरा गुरु ओळ्खण्याइतकी अध्यात्मिक पातळी वाढलेली असते.) एखादे काम केल्याशिवाय मोबदला सुद्धा कोणी देत नाही , महिना दहा हजार कमावणाऱ्यालासुद्धा पूर्ण महिना भरावा लागतो, सुट्टी केली तर पगार कट केला जातो, मग आपण देवाकडून कशी अपेक्षा करतो. त्याला काही नको फक्त मनापासून त्याचे नाम घ्यावे हीच त्याची इच्छा बदल्यात आपल्याला तो खुप काही देतो.
नामात खुप शक्ती आहे आपल्या मनाचे खेळ ओळखायला शिका, उघड्या डोळ्यांनी जग बघायला शिका, विद्या विकत नाही मिळत खरा गुरु हा नेहमी फक्त गुरु दक्षिणा घेतो ती सुद्धा योग्य वेळ आल्यावर, आजच्या युगात कमावणारे खुप आहेत पण गमवायची ताकद मोजक्यांचीच आहेत, कमरेला लंगोटी-खांद्यावर उपरणे वापरायला आवडते बाकी कपडे नकोसे वाटतात पण लोक बाबा बनवतात म्हणुन शर्ट-पॅन्ट वापरणारे बरेच आहेत पण ते खरे मार्गदर्शक आहेत त्यांना शोधा त्यांच्या कडे मीपणा नसतो नम्रपणा असते. ज्ञान वाढवा, नाम वाढवा, ध्यान वाढवा योग्य वेळेची वाट पहा. स्वामींवर विश्वास ठेवा उद्धार नक्की होणार याची खात्री.
श्री स्वामी समर्थ
स्वामींनी सुचवले आम्ही तुमच्यापुढे मांडले, करता-करविता स्वामी आम्ही फक्त नाममात्र.
आपला,
स्वामीभक्त(खुळा)
रितेश र. वेदपाठक
8421132224