कधी कधी आयुष्य खूप खडतर वाटेवर जगले जाते, मी मी म्हणणारे बऱ्याच वेळा शेपूट घालून बसलेलं पाहिले आहे. सर्वांना वाटते की माझेच अस कस झालं? मीच का या सगळ्यात, अजून किती सहन करू, माझे भोगच असतील हे कशावरून? असे एक ना अनेक प्रश्न असतात डोक्यात.
माझ्या जागेवर बसून बघा एक एक असे विषय असतात,की ते पाहिलं की आपले बर चालले आहे असे वाटतं, कोण कुठची एक आई तिच्या लेकी सहित नातीला घेऊन आली. लेकीचं पाहिले लग्न मोडले, दुसरे केले तर वर्षभराच्या आतच नवरा पोटात पोर असताना देहच सोडून गेला, नंतर सासू सासऱ्यांनी पैसा लुटला आणि हिला घराबाहेर केले, आता तिची लेक 5 वर्षाची झाली ही कहाणी सांगताना आजी ढसाढसा रडत होत्या.
लेकीची मानसिक स्थिती ढासळली सर्व बाजुंनी हरली, लढावेसे वाटते म्हणाली पण परिस्थिती अशी आहे की लोक जगू देत नाही. प्रत्येक जण फक्त वापर करतो आणि त्यांची वेळ निघाली की फेकून देतो.
कहाणी घर घर की आहे, पण आजींना स्वामींवर विश्वास आहे, कर्म आड येते हे मान्य आहे पण महाराज आहेत न्याय करायला असे त्या आजी म्हणतात, खरे आहे ते पटते मनाला. पण कर्माचा सिद्धांत कोणालाही सोडत नाही, योग्य वेळी तुमच्या नशीबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळनार, पण तो पर्यंत तठस्थ भूमिका घ्यावी लागते, मानसीक त्रास सहन करीत योग्य मार्गाने चालत राहिलो तर महाराज हाक नक्कीच ऐकणार, किती दिवस अजून सहन करू? याचे उत्तर माझ्याकडे देखील नव्हते, कारण योग्य वेळ आली की ती उत्तरं त्यांना मिळणार, तोपर्यंत शांतपणे 5 वर्षाच्या लेकीसाठी जग हाच सल्ला मी दिला......
मन हेलवणारे क्षण असतात कधीकधी,
सुचत नाही काही, बुद्धी मठ्ठ होते,
मी, माझे, माझंच करणाऱ्यांना सांगावेसे वाटतं, कधीतरी अश्या लोकांचा विचार करा. नुसत्या विचारांनीच तुम्ही उदास व्हाल, तर प्रत्यक्ष ती परिस्थिती जगणाऱ्या त्या देहाचे आणि मनाचे काय हाल होत असतील? विचार देखील करवत नाही.
सांगण्याचे उद्दीष्ट इतकेच की, आपली परिस्थिती या माऊलीच्या परिस्थिती सोबत जुळवा, आपली वेळ कित्येक पटीने चांगली आहे म्हणुन जगण्यासाठी स्वामीकृपेने बळ मिळेल..........
योग्य वेळ लवकर येवो, आणि अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व स्वामीभक्त स्वतःच्या असलेल्या विपत्तीतून बाहेर येवो हीच या खुळ्या स्वामीभक्ताची महाराजांच्या आणि गिरनारीच्या चरणी प्रार्थना...
श्री स्वामी समर्थ
स्वामीभक्त(खुळा)
माझ्या जागेवर बसून बघा एक एक असे विषय असतात,की ते पाहिलं की आपले बर चालले आहे असे वाटतं, कोण कुठची एक आई तिच्या लेकी सहित नातीला घेऊन आली. लेकीचं पाहिले लग्न मोडले, दुसरे केले तर वर्षभराच्या आतच नवरा पोटात पोर असताना देहच सोडून गेला, नंतर सासू सासऱ्यांनी पैसा लुटला आणि हिला घराबाहेर केले, आता तिची लेक 5 वर्षाची झाली ही कहाणी सांगताना आजी ढसाढसा रडत होत्या.
लेकीची मानसिक स्थिती ढासळली सर्व बाजुंनी हरली, लढावेसे वाटते म्हणाली पण परिस्थिती अशी आहे की लोक जगू देत नाही. प्रत्येक जण फक्त वापर करतो आणि त्यांची वेळ निघाली की फेकून देतो.
कहाणी घर घर की आहे, पण आजींना स्वामींवर विश्वास आहे, कर्म आड येते हे मान्य आहे पण महाराज आहेत न्याय करायला असे त्या आजी म्हणतात, खरे आहे ते पटते मनाला. पण कर्माचा सिद्धांत कोणालाही सोडत नाही, योग्य वेळी तुमच्या नशीबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळनार, पण तो पर्यंत तठस्थ भूमिका घ्यावी लागते, मानसीक त्रास सहन करीत योग्य मार्गाने चालत राहिलो तर महाराज हाक नक्कीच ऐकणार, किती दिवस अजून सहन करू? याचे उत्तर माझ्याकडे देखील नव्हते, कारण योग्य वेळ आली की ती उत्तरं त्यांना मिळणार, तोपर्यंत शांतपणे 5 वर्षाच्या लेकीसाठी जग हाच सल्ला मी दिला......
मन हेलवणारे क्षण असतात कधीकधी,
सुचत नाही काही, बुद्धी मठ्ठ होते,
मी, माझे, माझंच करणाऱ्यांना सांगावेसे वाटतं, कधीतरी अश्या लोकांचा विचार करा. नुसत्या विचारांनीच तुम्ही उदास व्हाल, तर प्रत्यक्ष ती परिस्थिती जगणाऱ्या त्या देहाचे आणि मनाचे काय हाल होत असतील? विचार देखील करवत नाही.
सांगण्याचे उद्दीष्ट इतकेच की, आपली परिस्थिती या माऊलीच्या परिस्थिती सोबत जुळवा, आपली वेळ कित्येक पटीने चांगली आहे म्हणुन जगण्यासाठी स्वामीकृपेने बळ मिळेल..........
योग्य वेळ लवकर येवो, आणि अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व स्वामीभक्त स्वतःच्या असलेल्या विपत्तीतून बाहेर येवो हीच या खुळ्या स्वामीभक्ताची महाराजांच्या आणि गिरनारीच्या चरणी प्रार्थना...
श्री स्वामी समर्थ
स्वामीभक्त(खुळा)