श्री स्वामी समर्थ
गुरु शिवाय आध्यात्मिक अभ्यासाने बौद्धिक ज्ञान वाढेल, अ त्याच बरोबर अहंकार पण वाढेल परंतु पाप नाश व आत्मिक शांती मिळणार नाही.म्हणून अध्यात्मिक जीवनात सदेहरूपी गुरु असणे फार महत्वाचे आहे, गुरु असल्या शिवाय अध्यात्मिक तंत्रज्ञानाचा अधिकारच प्राप्त होत नाही.
गुरु व् मंत्र यात फरक नसतो व ज्यांना ध्यानात सहस्त्राधार चक्रात श्री गुरूंचे ध्यान करणे जमत नसेल तर प्रत्यक्ष सहवासात राहून दृष्टिसुख अनुभवावे कारण गुरु हाच एकमेव कल्याण कारक आहे.
गुरुवर श्रद्धा अध्यात्माची श्रद्धा निर्माण करते या पृथ्वीतलावर गुरुच एक तारक-रक्षक-पालक असतो. गुरु संतुष्ट झाल्याने सर्व देवता संतुष्ट होतात. गुरुकृपेपेक्षा श्रेष्ठ ऎसे शास्त्र-मन्त्र-तप-फळ-देवता नाही.
गुरुकृपाच श्रेष्ठ व मोक्षदायक आहे नित्य गुरुसेवा-गुरुभक्ति करण्याचे योग हे दुर्लभ असून त्या मुळे भक्ताची मंत्र सिद्धी होउन तो जीवन मुक्त होतो.
भारताच्या आध्यात्मिक विश्वात सद्द्या जे काही आध्यात्मिक मार्ग अस्तित्वात आहेत त्यात काही सिद्धिंच्या प्राप्तीने अनेक जण तथाकथिक गुरु बनून भोळ्या-श्रद्धाळु जनांचा फायदा घेत आहेत व चुकीच्या मार्गाने नेत आहेत ईश्वरी कार्यात अडथळे निर्माण करणाऱ्या अशा लोकांचा वंश नाश होउन पृथ्वीवरील त्यांच्या पिढीचे अस्तित्वच नष्ट होते.
चांगल्या बरोबर वाईट हे प्रकृतीचीच लीला आहे आणि स्वामींचे खेळ सुद्धा स्वामीच जाणतात मी पामर काय बोलणार
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
गुरु शिवाय आध्यात्मिक अभ्यासाने बौद्धिक ज्ञान वाढेल, अ त्याच बरोबर अहंकार पण वाढेल परंतु पाप नाश व आत्मिक शांती मिळणार नाही.म्हणून अध्यात्मिक जीवनात सदेहरूपी गुरु असणे फार महत्वाचे आहे, गुरु असल्या शिवाय अध्यात्मिक तंत्रज्ञानाचा अधिकारच प्राप्त होत नाही.
गुरु व् मंत्र यात फरक नसतो व ज्यांना ध्यानात सहस्त्राधार चक्रात श्री गुरूंचे ध्यान करणे जमत नसेल तर प्रत्यक्ष सहवासात राहून दृष्टिसुख अनुभवावे कारण गुरु हाच एकमेव कल्याण कारक आहे.
गुरुवर श्रद्धा अध्यात्माची श्रद्धा निर्माण करते या पृथ्वीतलावर गुरुच एक तारक-रक्षक-पालक असतो. गुरु संतुष्ट झाल्याने सर्व देवता संतुष्ट होतात. गुरुकृपेपेक्षा श्रेष्ठ ऎसे शास्त्र-मन्त्र-तप-फळ-देवता नाही.
गुरुकृपाच श्रेष्ठ व मोक्षदायक आहे नित्य गुरुसेवा-गुरुभक्ति करण्याचे योग हे दुर्लभ असून त्या मुळे भक्ताची मंत्र सिद्धी होउन तो जीवन मुक्त होतो.
भारताच्या आध्यात्मिक विश्वात सद्द्या जे काही आध्यात्मिक मार्ग अस्तित्वात आहेत त्यात काही सिद्धिंच्या प्राप्तीने अनेक जण तथाकथिक गुरु बनून भोळ्या-श्रद्धाळु जनांचा फायदा घेत आहेत व चुकीच्या मार्गाने नेत आहेत ईश्वरी कार्यात अडथळे निर्माण करणाऱ्या अशा लोकांचा वंश नाश होउन पृथ्वीवरील त्यांच्या पिढीचे अस्तित्वच नष्ट होते.
चांगल्या बरोबर वाईट हे प्रकृतीचीच लीला आहे आणि स्वामींचे खेळ सुद्धा स्वामीच जाणतात मी पामर काय बोलणार
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏