Sunday, September 22, 2019

नामस्मरण हीच सर्वात मोठी साधना आहे...

नामस्मरण हीच सर्वात मोठी साधना आहे...
      श्री राम भक्त हनुमान हे सर्वात मोठे नाम साधनेचे उत्तम उदाहरण आहेत, हनुमानने संपूर्ण आयुष्य फ़क्त राम नाम जपले, त्यातूनच त्याने त्यांच्या गुरुला म्हणजे रामाला मिळवले. आपणही तेच केले पाहिजे, फ़क्त नाम जप करत रहायचे  त्यातून काय मिळेल याचा विचारच मुळी करू नये, म्हणतात ना कर्म किये जा फल की चिंता मत कर अगदी तसेच.
      पण आजच्या जीवनात प्रत्येकाला झटपट गुरु हवा असतो, मग त्यासाठी कोणीही गुरु म्हणून समोर आला तरी साधकाचा त्याच्यावर संपूर्ण विश्वास बसतो. कोणीही उपटसुम्भ येतो आणि आपल्याला म्हणतो,"चल माझ्या बरोबर मी तुला दीक्षा देतो." आणि आम्ही भावनेच्या आहारी जाउन त्याच्या मागे लागतो. का तुम्हाला स्वतःची बुद्धि नाही??? कशी असणार आजच्या धकाधकीच्या जीवनात पेपर वाचायला चावट कथा वाचायला वेळ आहे, पण दुर्मिळ ग्रंथ वाचायला वेळ नाही. अरे दीक्षा काय भातुकलीचा खेळ वाटला का? कोणालाही मिलायला.आम्ही गुरुचरित्र वाचतो, पण अनुकरण काय???? पोथी नुसती वाचून काय उपयोग??? त्या वर काही अनुकरण?? शून्य. उपड़या घड्यावर पाणी.
       जरी खरा गुरु मिळाला तरी तो सांगेल त्या मार्गावर जायची तैयारी आहे का??? नाही??? अजिबात जमणार नाही. मग उगाच हट्ट का करता मला अध्यात्मात पुढे जायचय म्हणून गुरु जे सांगेल ते ऐकले पाहिजे, जा गीता वाचा आणि त्याचे अनुकरण करा आयुष्य सोपे होईल जगायला. पण नाही??? शिवाजी जन्मावा पण बाजूच्या घरात. तसेच अध्यात्मचेही आहे, आम्हाला गुरु हवाय पण साधने शिवाय??? आयुष्यभर ऋषिमुनींनी साधना केली आणि सिद्धि मिळावल्या, आपल्याला जमणार आहे का?? पारायण चालू आहे 7 दिवसांचे पण बाजूने पोरगी गेली तरी, काय कड़क माल आहे यार??? ऎसे बोलनारे पुष्कळ पहिलेत.. काही मंडळी तर देवळात चक्क देवाला दर्शन द्यायला येतात. तिची साडी बघ? मंगळसूत्र बघ? अमके बघ? तमके बघ? हे विचार चक्क दर्शन घेताना असतात... म्हणजे देवळात देवाचेच लक्ष्य तुमच्याकडे आणि तुमचे इकडे तिकडे. कशाला हवे आहे ते??? गप गुमान नामस्मरण करा ना?? डोक्याला शांती मिळेल. आलात कशाला? करताय काय?
      संपूर्ण आयुष्य दुसऱ्यासाठी खर्ची करा आनंद मिळतो. काहीही करत असाल तरीही नामस्मरण करा इतर विचार मनात आणु नका. त्यातूनच अध्यात्माची प्रगति होते जे जेव्हा घडायचे आहे तेव्हाच ते घडणार, तुम्ही, आम्ही कितीही डोके आपटले तरीही उपयोग काहीही होणार नाही. म्हणूनच नामाला आपल्या अंगी इतके भिनवा, की आपल्याला इतरत्र लक्ष जाण्याचा त्रास होणार नाही, नामासाठी वेडे व्हा तेव्हाच योग्य गुरु तुमच्या समोर उभा राहील. तो कधी मिळेल याच्या मागे तुम्ही नका लागुत!!! योग्य वेळ आली की घडेलच. कड़क परीक्षा द्यायची तैयारी ठेवा... नामस्मरण मुखी ठेवा स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल......
        अशक्य ही शक्य करतील स्वामी हे कायम लक्षात ठेवा. तुमचा खरा गुरु स्वामीच आहे, बाकीचे फ़क्त स्वामी भक्त आहेत हे लक्षात असू देत. त्यांच्या साधनेला नमस्कार आणि त्यांना टाटा बायबाय.........
श्री गुरुदेव दत्त.......
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

आपला
स्वामिभक्त(खुळा)
7972033197
8421132224

Friday, September 20, 2019

खाली मेरी झोली

जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी

दहा हजार पायऱ्या चढतांना बऱ्याच जणांना सर्वात पहिले डोळ्यासमोर अंधारच येतो, इतक्या पायऱ्या आपण कसे चढणार? यातच अर्धे खचून जातात, त्यापेक्षा नामस्मरण करत चढतांना खूप मजा येते.
दत्त पादुकांचे दर्शन मन मोहून जाते, दत्त धुनीचा मंद सुवास शरीरातला सर्व थकवा घालवून टाकतो, आजूबाजूचा डोंगररांगांचा परिसर तिथेच बैठक मारायला भाग पाडतो. परंतु अशा अवस्थेत तिथे बसणेही मुश्किल, लोक आपल्याच पाया पडायला रांगा लावतात, आणि मग तेथून पळ काढावा लागतो.......

दत्त शिखरावर कायमच मन अडकून राहिलेलं असते, तिथे मिळणारे मानसिक समाधान आजपर्यंत मलातरी कुठे अनुभवास आले नाही. आजवर अनेकदा गिरनार ला जाणे झाले कधी तासभर, तर कधी दोन मिनिटे तिथे वेळ मिळाला, पण जे मिळाले त्यात कायम समाधान होते. म्हणूनच की काय दत्त महाराजांनी प्रत्येक हट्ट पुरवला, आणि आजही पुरवत आहेत, बरीच मंडळी मागे लागतात की आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत घ्या, पण काय उपयोग? आणि कशासाठी? फक्त रितेश आणि आनंद सोबत येऊन काही अनुभूती येणार नाही? अनुभूती मिळेल ती तुमच्या श्रद्धेने, तुमच्या स्व कष्टाच्या साधनेने, उगाच ओढून- ताणून काही मिळत नाही, त्यासाठी साधना महत्वाची, नामस्मरणाचा महिमा अपरंपार आहे यात वादच नाही, भले- भले संत- महात्मे पुराणांमध्ये उल्लेख करून गेले याच गोष्टींचा. पण आमची मानसिकता अशी की आम्हाला सहज साध्य झाले पाहिजे, मात्र त्यासाठी लागणारे कष्ट सोसायची तयारी नसते, मी-मी करतांना मीच आडवा येतो आणि साधनेची माती करून जाते. त्यामुळे येथे काहीही साध्य होत नाही, आणि महाराज काही सोडणार नाही, दहा वेळा बजावून देखील ऐकले नाही की सळो को पळो करणार आणि अक्कल आली की सरळ रेषेत आणणार. तो पर्यंत वेळ जातो आणि कष्ट खूप करावे लागतात, पण पर्याय नसतो. म्हणूनच वेळेवर योग्य वागणे गरजेचे आहे.सरळ साधे नाम घ्यावे, त्याच रंगी रंगावे आणि समाधान मानावे, परमार्थ त्यातच मिळतो, उगाच मला हवेच म्हणून काहीच मिळणार नाही उलट हातातले गमवायची येते. त्यापेक्षा मिळेल ते घेऊन जपले तर कृपा वर्षाव अनंत कृपेने रहातो.

पिछे ना आ मेरे यारा, हमारे हाथ कूछ भी नही,
हमतो वो फकीर है जीसकी झोली भी खाली है,
हमतो कुछ भी नही स्वामी ही खिलाडी है ll
बाबाके खेल बाबाही जाने हमतो उसके बिघडे शहेजादे.....

आपला,
स्वामी नामी बिघडलेला
स्वामीभक्त(खुळा)
रितेश रविंद्र वेदपाठक.
🚬जय शंकर

अशाच एका गिरनारच्या वळणावर

अशाच एका गिरनारच्या वळणावर ते भेटले, पायाची नखे वाढलेली, तुरुतुरु धावणारे, पण घट्ट धरूनच ठेवावं त्या पायांना असा अविर्भाव झाला, कमरेखाली भगवी लुंगी, अंगात सफेद बंडी, उंच धिप्पाड देह, काखेत झोळी, गळ्यात छोट्या रुद्राक्षांची माळा,पांढरी शुभ्र खुरतडलेली दाढी, डोळ्यावर चष्मा, अंगकांती सुद्धा तेजोमय अशी, डोक्यावर पांढरे केस, मुखात राम नाम, त्यांना बघताच क्षणी असे वाटले की माझे जणू स्वामी आजोबाच समोर उभे ठाकले. त्यांनी देखील समोर बघताच ब्रम्हांड हास्य केले, जणू काही ते माझी वाटच पहात होते, त्यांनी पायातील वहाण बाजूला केले आणि मला साष्टांग दंडवताचे आमंत्रण दिले. बऱ्याच वर्षा पासून याच क्षणाची वाट पहात होतो, आधी हट्ट करून देखील लांबूनच बोल म्हणणारे आज चक्क समोर पाय मोकळे करून धर म्हणाले, यात माझा आनंद गगनात मावेनासा झाला, मुखी त्यांच्या रामनाम होते पण मला जणू माझा रामराया मिळाला.

मी काय? कार्य काय? तुम्ही माझे कोण? नकळत प्रश्न त्यांच्यासमोर निघाले तर म्हणाले, "साधन.माशाच्या पिलालापोहायचे कसे हे शिकवायचे नसते .सांगायला बापाची परवानगी नाही ." म्हणजे मी अजून तयार झालो नाही याची 100% खात्री पटली, बापाची आखणी सुरू आहे त्यांचे लक्ष आहे यात समाधान होते. नकळत शब्द फुटले...

ना मे जानू हिरे मोती
ना मे जानू साज रे
गुरू सेवा सदा करू
यही मन मे ध्यास रे......

तर मला म्हणतात कसे,

"सद्गुरु तेरा हिरा
सद्गुरू तेरा मोती
सद्गुरु तेरा साज
सद्गुरू तेरा आवाज
सद्गुरूही तेरा अंदाज ."

काय बोलावे सुचलच नाही, ते ही हसले, मी म्हणालो अजून काय तर म्हणाले, खुळ्या वेळ संपली, योग्य वेळी योग्य ठिकाणी पुन्हा भेट होईलच.
तुझ्यावर कार्य सोपवले आहे ते घडावे म्हणून आपली भेट.....

स्वतः तिथेच बसून मला मात्र चालता केला पुन्हा भेटण्यासाठी, अजून एक पर्व सुरू, जय गिरनारी.......

स्वामीभक्त (खुळा)
श्री रितेश रविंद्र वेदपाठक.

Wednesday, August 28, 2019

महाराजांचे लाड २९ ऑगस्ट २०१९.

आज दिनांक २९ ऑगस्ट २०१९ रोजी 
महाराजांचे लाड





Saturday, August 3, 2019

गिरनार के गिरनारी नमो नमः

श्री स्वामी समर्थ

नाम तेरा मैं खुळा लेके चलूं,
दर पर तेरे ए गिरनारी.
आस ना कोई हे मन मे मेरे,
दर्शन दे रे गिरनारी.
देख लु तुझको जी भर के मैं,
दर्शन को तेरे लाखो खड़े है.
अवधूत है तू रे तुही रे दिगंबर,
समाले हे गिरनारी खुळाको तेरे अंदर.
नाम जपु मैं तेरा गिरनारी,
सारे जगत भर सत्ता है तेरी.
दत्त दत्त बोले भक्त ये सारे,
लगते है सारे ये तुझको ही प्यारे.
भूल चला मैं मेरे ही मन को,
तन मन धन सारा दे दिया तुझको.
ओ गिरनारी तेरे गिरनार आउ मैं,
बार-बार-बार गिरनार आऊ मे.
जब तू ना समाये मुझमे गिरनारी,
लगी है मन मे नाम की भूख ये प्यारी.
तेरा चसका मदिरा से भी नशीला है,
दस हजार पायरी पे ना किसका वशिला है.
गुरुओंके गुरू तुम हे दत्त महाराज,
दत्त दिगंबर अवधुत यही तुम्हारा साज.
झोली मे तेरे है सारा संसार समाया,
कमंडलू भर भर के तुने है प्यार लुटाया.
तुने जीसका भी रे हाथ है थामा,
वह भक्त पहचान गया इस संसार की मोह माया.
हे गिरनारी हे प्रभु शरण मे लो, ना दूर करो,
भक्त ये भुखे हे तेरे प्यार को, ये तडप दूर करो.
कलियुग का अंत करो भगवंत,
शक्ती मे समाओ नया रूप लो भगवंत.

स्वामीभक्त(खुळा)
श्री रितेश र. वेदपाठक
7972033197

Wednesday, June 12, 2019

ध्यानावर काही विश्लेषण.....

नमस्कार,
ध्यान या विषयावर किती आणी काय बोलू हे काही मला समजत नाही पण जे माझ्या मनाला पटतय तेच लिहितोय.

          ध्यान ही एक अदभूत अशी साधना आहे जीच्यासाठी शरीरावरील संपूर्ण संयम सोडावा लागतो. कारण ध्यानामुळेच आपल्याला आपल्या भगवंताचे दर्शन घडते आपल्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि आपण मोक्षाचे धनि होतो. कोणी कितीही साधना केली तरीही त्याला ती अपुरीच वाटते कारण साधनेला सीमा नसते. साधना करण्यासाठी ध्यानाची नितांत आवश्यकता असते मन,शरीर यांचा एक अमुलाग्र संगम आवश्यक असतो कारण त्यामुळीच परमार्थ साधता येतो कोणत्याही अरिष्टावर मात करता येऊ शकते.
           ध्यान करताना जागा कोणतीही असू दे काही फरक पडत नाही फक्त मन खंबीर असायला हवे, आपण ज्या जागी असू तेथेच आपण ध्यान लाऊन साधना करू शकतो. डोळे हळूहळू बंद करावेत कोणताही ताण आपल्या मनावर देऊ नये आणी आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहुन हळूहळू बाहेर येत आहोत अशी धारणा करावि. त्या ठिकाणाहून आपण पुढे जात आहोत आजू -बाजूला खुप गडबड -गोंधळ आहे त्यातून पण थोडेसे पुढे गेल्यावर वातावर शान्त आहे , फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आहे तिथुन  अजून पुढे शांत वातावरण, वरती शांत आकाश, खाली शांत धरणी माता आहे. त्यातूनच आपल्या मनाला शांत करायचे आहे, अजून थोडे पुढे जायचे आहे आपण जरी प्रत्यक्षात जात नसलो तरी मनाने जायचे आहे, त्यातच खरी मजा आहे. अजून पुढे संपूर्ण शांतता आहे इथे आपल्याला कसलाच आवाज नाही, ना पक्ष्यांचा ना आणखीन कसलाच. आता आहोत ते फक्त आपण स्वतः, वरती मोकळे आकाश खाली हिरवीगार धरती माय. तसेच पुढे आलो की आपल्यासाठी अंथरलेले आसन, त्यावर बसून समोर पाहिले तर समोर साक्षात गणपती बाप्पा आहेत, डाव्या हाताला आपले गुरू, उजव्या हाताला देवगुरु बृहस्पती, त्यांच्या मागे भगवान शिव - पार्वती, विष्णू- लक्ष्मी, ब्रम्हा - सरस्वती, इंद्र आणि सोबत समस्त देव परिवार, गंधर्व परिवार, समस्त गण परिवार पण इतके सगळे असून देखील कोणाचाही आवाज नाही.

आपण आपली मानसपूजा सुरू करायची, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं महाराजांच्या चरणी प्रार्थना करायची, " हे गुरुवर्य मी तुम्हाला शरण आहे माझी अल्पमती काहीही समजून घेण्यास असमर्थ आहे, त्यामुळे आपणच माझ्याकडून योग्य ती सेवा घडवावी ही विनंती. हे गुरुवर्य आपण मला योग्य रस्ता दाखवा, तुम्ही दाखवलेल्या मार्गानेच मी चालेन, आजपासून मी माझे सर्वस्व तुम्हाला देत आहे, तुमच्या चरणी सर्वसमर्पण करीत आहे, माझे योग्य- अयोग्य तुम्ही पाहावे येणाऱ्या भोगांना भोगण्यासाठी आपण मला शक्ती द्यावी ही विनंती.


असे बोलून आपण आपले डोळे बंद करायचे व आपल्या ध्यानात जाण्याचा प्रयत्न करायचा. आपल्या श्वासावरील आपले नियंत्रण हळूहळू सोडायचे शरीराला हळूहळू वजन मुक्त करायचे, हळूहळू आपण एका वेगळ्याच विषयात- विश्वात रममाण होतो नामाची गोडी फार सुंदर आहे त्यात एक वेगळीच नशा आहे. आपला भार आपल्या गुरूंवर सोडून आपण नामाच्या दुनियेत रममाण व्हायचे. त्यानंतर जे घडेल ते घडू द्यावं. या दरम्यान शरीरावर कोणतेही बंधन ठेवायचे नाही. आपल्या शरीरातील कुंडलिनी शक्ती हळूहळू जागृत होऊन तिचे कार्य सुरू करते आणि साधक साधनेच्या विशिष्ट पातळीवर पोहोचतो.


या साधनेनंतर येणारे अनुभव हे विलक्षण असतात, आपण कोठे आहोत याला महत्त्व न देता आपण काय मिळवले याला महत्त्व द्यावं, ध्यानाची ही अजब मजा प्रत्येकाने चाखावी हे माझे वैयक्तिक मत आहे.

स्वामीभक्त(खुळा)
श्री रितेश र वेदपाठक.