जय गिरनारी, तेरा भरोसा है भारी
दहा हजार पायऱ्या चढतांना बऱ्याच जणांना सर्वात पहिले डोळ्यासमोर अंधारच येतो, इतक्या पायऱ्या आपण कसे चढणार? यातच अर्धे खचून जातात, त्यापेक्षा नामस्मरण करत चढतांना खूप मजा येते.
दत्त पादुकांचे दर्शन मन मोहून जाते, दत्त धुनीचा मंद सुवास शरीरातला सर्व थकवा घालवून टाकतो, आजूबाजूचा डोंगररांगांचा परिसर तिथेच बैठक मारायला भाग पाडतो. परंतु अशा अवस्थेत तिथे बसणेही मुश्किल, लोक आपल्याच पाया पडायला रांगा लावतात, आणि मग तेथून पळ काढावा लागतो.......
दत्त शिखरावर कायमच मन अडकून राहिलेलं असते, तिथे मिळणारे मानसिक समाधान आजपर्यंत मलातरी कुठे अनुभवास आले नाही. आजवर अनेकदा गिरनार ला जाणे झाले कधी तासभर, तर कधी दोन मिनिटे तिथे वेळ मिळाला, पण जे मिळाले त्यात कायम समाधान होते. म्हणूनच की काय दत्त महाराजांनी प्रत्येक हट्ट पुरवला, आणि आजही पुरवत आहेत, बरीच मंडळी मागे लागतात की आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत घ्या, पण काय उपयोग? आणि कशासाठी? फक्त रितेश आणि आनंद सोबत येऊन काही अनुभूती येणार नाही? अनुभूती मिळेल ती तुमच्या श्रद्धेने, तुमच्या स्व कष्टाच्या साधनेने, उगाच ओढून- ताणून काही मिळत नाही, त्यासाठी साधना महत्वाची, नामस्मरणाचा महिमा अपरंपार आहे यात वादच नाही, भले- भले संत- महात्मे पुराणांमध्ये उल्लेख करून गेले याच गोष्टींचा. पण आमची मानसिकता अशी की आम्हाला सहज साध्य झाले पाहिजे, मात्र त्यासाठी लागणारे कष्ट सोसायची तयारी नसते, मी-मी करतांना मीच आडवा येतो आणि साधनेची माती करून जाते. त्यामुळे येथे काहीही साध्य होत नाही, आणि महाराज काही सोडणार नाही, दहा वेळा बजावून देखील ऐकले नाही की सळो को पळो करणार आणि अक्कल आली की सरळ रेषेत आणणार. तो पर्यंत वेळ जातो आणि कष्ट खूप करावे लागतात, पण पर्याय नसतो. म्हणूनच वेळेवर योग्य वागणे गरजेचे आहे.सरळ साधे नाम घ्यावे, त्याच रंगी रंगावे आणि समाधान मानावे, परमार्थ त्यातच मिळतो, उगाच मला हवेच म्हणून काहीच मिळणार नाही उलट हातातले गमवायची येते. त्यापेक्षा मिळेल ते घेऊन जपले तर कृपा वर्षाव अनंत कृपेने रहातो.
पिछे ना आ मेरे यारा, हमारे हाथ कूछ भी नही,
हमतो वो फकीर है जीसकी झोली भी खाली है,
हमतो कुछ भी नही स्वामी ही खिलाडी है ll
बाबाके खेल बाबाही जाने हमतो उसके बिघडे शहेजादे.....
आपला,
स्वामी नामी बिघडलेला
स्वामीभक्त(खुळा)
रितेश रविंद्र वेदपाठक.
🚬जय शंकर
दहा हजार पायऱ्या चढतांना बऱ्याच जणांना सर्वात पहिले डोळ्यासमोर अंधारच येतो, इतक्या पायऱ्या आपण कसे चढणार? यातच अर्धे खचून जातात, त्यापेक्षा नामस्मरण करत चढतांना खूप मजा येते.
दत्त पादुकांचे दर्शन मन मोहून जाते, दत्त धुनीचा मंद सुवास शरीरातला सर्व थकवा घालवून टाकतो, आजूबाजूचा डोंगररांगांचा परिसर तिथेच बैठक मारायला भाग पाडतो. परंतु अशा अवस्थेत तिथे बसणेही मुश्किल, लोक आपल्याच पाया पडायला रांगा लावतात, आणि मग तेथून पळ काढावा लागतो.......
दत्त शिखरावर कायमच मन अडकून राहिलेलं असते, तिथे मिळणारे मानसिक समाधान आजपर्यंत मलातरी कुठे अनुभवास आले नाही. आजवर अनेकदा गिरनार ला जाणे झाले कधी तासभर, तर कधी दोन मिनिटे तिथे वेळ मिळाला, पण जे मिळाले त्यात कायम समाधान होते. म्हणूनच की काय दत्त महाराजांनी प्रत्येक हट्ट पुरवला, आणि आजही पुरवत आहेत, बरीच मंडळी मागे लागतात की आम्हाला सुद्धा तुमच्या सोबत घ्या, पण काय उपयोग? आणि कशासाठी? फक्त रितेश आणि आनंद सोबत येऊन काही अनुभूती येणार नाही? अनुभूती मिळेल ती तुमच्या श्रद्धेने, तुमच्या स्व कष्टाच्या साधनेने, उगाच ओढून- ताणून काही मिळत नाही, त्यासाठी साधना महत्वाची, नामस्मरणाचा महिमा अपरंपार आहे यात वादच नाही, भले- भले संत- महात्मे पुराणांमध्ये उल्लेख करून गेले याच गोष्टींचा. पण आमची मानसिकता अशी की आम्हाला सहज साध्य झाले पाहिजे, मात्र त्यासाठी लागणारे कष्ट सोसायची तयारी नसते, मी-मी करतांना मीच आडवा येतो आणि साधनेची माती करून जाते. त्यामुळे येथे काहीही साध्य होत नाही, आणि महाराज काही सोडणार नाही, दहा वेळा बजावून देखील ऐकले नाही की सळो को पळो करणार आणि अक्कल आली की सरळ रेषेत आणणार. तो पर्यंत वेळ जातो आणि कष्ट खूप करावे लागतात, पण पर्याय नसतो. म्हणूनच वेळेवर योग्य वागणे गरजेचे आहे.सरळ साधे नाम घ्यावे, त्याच रंगी रंगावे आणि समाधान मानावे, परमार्थ त्यातच मिळतो, उगाच मला हवेच म्हणून काहीच मिळणार नाही उलट हातातले गमवायची येते. त्यापेक्षा मिळेल ते घेऊन जपले तर कृपा वर्षाव अनंत कृपेने रहातो.
पिछे ना आ मेरे यारा, हमारे हाथ कूछ भी नही,
हमतो वो फकीर है जीसकी झोली भी खाली है,
हमतो कुछ भी नही स्वामी ही खिलाडी है ll
बाबाके खेल बाबाही जाने हमतो उसके बिघडे शहेजादे.....
आपला,
स्वामी नामी बिघडलेला
स्वामीभक्त(खुळा)
रितेश रविंद्र वेदपाठक.
🚬जय शंकर
🙏🙏🙏🙏
ReplyDeleteखरंच... श्री अंबाजी दर्शना नंतर जेव्हा गुरु शिखराचे दर्शन होत त्याने उत्साह द्विगुणित होतो... कधी एकदा त्या गुरुशिखराच्या देवळात श्री दत्त महाराजांचं दर्शन घेतो असं होतं... खूप प्रसन्नता वाटते...
ReplyDelete