Sunday, September 22, 2019

नामस्मरण हीच सर्वात मोठी साधना आहे...

नामस्मरण हीच सर्वात मोठी साधना आहे...
      श्री राम भक्त हनुमान हे सर्वात मोठे नाम साधनेचे उत्तम उदाहरण आहेत, हनुमानने संपूर्ण आयुष्य फ़क्त राम नाम जपले, त्यातूनच त्याने त्यांच्या गुरुला म्हणजे रामाला मिळवले. आपणही तेच केले पाहिजे, फ़क्त नाम जप करत रहायचे  त्यातून काय मिळेल याचा विचारच मुळी करू नये, म्हणतात ना कर्म किये जा फल की चिंता मत कर अगदी तसेच.
      पण आजच्या जीवनात प्रत्येकाला झटपट गुरु हवा असतो, मग त्यासाठी कोणीही गुरु म्हणून समोर आला तरी साधकाचा त्याच्यावर संपूर्ण विश्वास बसतो. कोणीही उपटसुम्भ येतो आणि आपल्याला म्हणतो,"चल माझ्या बरोबर मी तुला दीक्षा देतो." आणि आम्ही भावनेच्या आहारी जाउन त्याच्या मागे लागतो. का तुम्हाला स्वतःची बुद्धि नाही??? कशी असणार आजच्या धकाधकीच्या जीवनात पेपर वाचायला चावट कथा वाचायला वेळ आहे, पण दुर्मिळ ग्रंथ वाचायला वेळ नाही. अरे दीक्षा काय भातुकलीचा खेळ वाटला का? कोणालाही मिलायला.आम्ही गुरुचरित्र वाचतो, पण अनुकरण काय???? पोथी नुसती वाचून काय उपयोग??? त्या वर काही अनुकरण?? शून्य. उपड़या घड्यावर पाणी.
       जरी खरा गुरु मिळाला तरी तो सांगेल त्या मार्गावर जायची तैयारी आहे का??? नाही??? अजिबात जमणार नाही. मग उगाच हट्ट का करता मला अध्यात्मात पुढे जायचय म्हणून गुरु जे सांगेल ते ऐकले पाहिजे, जा गीता वाचा आणि त्याचे अनुकरण करा आयुष्य सोपे होईल जगायला. पण नाही??? शिवाजी जन्मावा पण बाजूच्या घरात. तसेच अध्यात्मचेही आहे, आम्हाला गुरु हवाय पण साधने शिवाय??? आयुष्यभर ऋषिमुनींनी साधना केली आणि सिद्धि मिळावल्या, आपल्याला जमणार आहे का?? पारायण चालू आहे 7 दिवसांचे पण बाजूने पोरगी गेली तरी, काय कड़क माल आहे यार??? ऎसे बोलनारे पुष्कळ पहिलेत.. काही मंडळी तर देवळात चक्क देवाला दर्शन द्यायला येतात. तिची साडी बघ? मंगळसूत्र बघ? अमके बघ? तमके बघ? हे विचार चक्क दर्शन घेताना असतात... म्हणजे देवळात देवाचेच लक्ष्य तुमच्याकडे आणि तुमचे इकडे तिकडे. कशाला हवे आहे ते??? गप गुमान नामस्मरण करा ना?? डोक्याला शांती मिळेल. आलात कशाला? करताय काय?
      संपूर्ण आयुष्य दुसऱ्यासाठी खर्ची करा आनंद मिळतो. काहीही करत असाल तरीही नामस्मरण करा इतर विचार मनात आणु नका. त्यातूनच अध्यात्माची प्रगति होते जे जेव्हा घडायचे आहे तेव्हाच ते घडणार, तुम्ही, आम्ही कितीही डोके आपटले तरीही उपयोग काहीही होणार नाही. म्हणूनच नामाला आपल्या अंगी इतके भिनवा, की आपल्याला इतरत्र लक्ष जाण्याचा त्रास होणार नाही, नामासाठी वेडे व्हा तेव्हाच योग्य गुरु तुमच्या समोर उभा राहील. तो कधी मिळेल याच्या मागे तुम्ही नका लागुत!!! योग्य वेळ आली की घडेलच. कड़क परीक्षा द्यायची तैयारी ठेवा... नामस्मरण मुखी ठेवा स्वामींच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होईल......
        अशक्य ही शक्य करतील स्वामी हे कायम लक्षात ठेवा. तुमचा खरा गुरु स्वामीच आहे, बाकीचे फ़क्त स्वामी भक्त आहेत हे लक्षात असू देत. त्यांच्या साधनेला नमस्कार आणि त्यांना टाटा बायबाय.........
श्री गुरुदेव दत्त.......
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

आपला
स्वामिभक्त(खुळा)
7972033197
8421132224

7 comments:

  1. Tumchya guidance sathi thank you.

    ReplyDelete
  2. || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

    ReplyDelete
  3. Khup Chan samjavla tumhi.. Shri dutt.,🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. खूप छान... स्पष्ट भाषेत अगदी परखडपणे सांगितले आहे

    ReplyDelete
  5. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

    ReplyDelete